जगाच्या पाठीवर नाही झाला
राजा तुमाच्या-परी
अवतार घ्या महाराष्ट्रात
गरज आहे खरी
नाही उरले बाजी तानाजी
आणि त्यांचे संस्कार
युवा पिढी झालीय व्यसनाधिन
वाटतो त्यांचा धिक्कार
फुकनीसारखे मनगट घेऊन
राजे हे काय लढणार
मग सुराज्याची पताका
वर कशी काय चढणार
घ्या अवतार राजे
तालमींना महत्व येऊ दे
दणकट सारे शरीर यांचे
मनगट पोलादी होऊ दे
पिझ्झा बर्गर संस्कृतीतून
काढा यांना बाहेर
द्यायला शिकवा यांना
साडी चोळीचा आहेर
दुमदुमू देत पुन्हा महाराष्ट्रात
एकवीस तोफांचे आवाज
कनकनातून नाद येईल
जन्म घ्या शिवराज
जन्म घ्या शिवराज
-बाळराजे